चक्रीवादळाने केलेअनेकांची घर -संसार उद्वस्थ


चक्रीवादळाने केलेअनेकांची घर -संसार उद्वस्थ


नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुका अंतर्गत मौजा बोरडा,  सराखा  ,सत्रापुर  व खुमारी या गावात  काल दिनांक 30 मार्च ला अचानक आलेल्या चक्र वादळाने अनेकांच्या घराचे छत उडाल्याने अनेक कुटुंबाचा संसार उघड्यावर पडल्याचे  चित्र निदर्शनास येत आहे.


  आलेल्या चक्रीवादळाने  मोठमोठे झाड बुडापासुन उखडून व तुटून विद्युतखांबावर  पडल्याने तार तुटून विद्युत पुरवठा बंद पडलेला आहे.  त्यामुळे गावातील नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात  जागुन काढावी लागली आहे


2 मिनिटांच्या या  रौंद्ररूपी चक्री वादळाने बहुतांश कुटुंबियांना उद्वस्थ करून टाकले आहे.


30 मार्चला सायंकाळी 7.30 वाजता पासूनच वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली होती.  अचानक  8.30  वाजताच्या सुमारास पाऊस येत असतांनाच वादळाने रौंद्ररूप धारण केले व मकानाचे छत हवेत उडू लागले   सराखा, सत्रापूर , बोरडा आणि खुमारी येथील अनेकांच्या घरावरील टिनाचे शेड क्षणातच उडून रस्त्यावर आले तर कुणाच्या घरावरील शेड उडून कुठे गेले याचा शोध अजूनही लागलेला नाही. 


असाच हाल शेतकऱ्यांचा देखील बघावयास मिळाला. शेतकऱ्यांनी आपल्या शेतात संपूर्ण कापूस शेतामध्ये  टिनाचा शेड असलेल्या गोठ्यात ठेवले होते .मात्र अचानक आलेल्या या वादळाने गोठ्यावरील टिना चे शेड उडून गेले व पावसामुळे संपूर्ण कापूस ओला झाला.



गावातील सरपंच, उपसरपंच, व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह कान्द्री- सोनेघाट सर्कलचे जि.प.सदस्य संजय झाडे यांनी घटनास्थळी जावून नुकसानीचा जायजा घेतला.  त्यांनी विद्युत विभाग,  तहसीलदार,   मंडळ अधिकारी,  पटवारी व कोतवाल  तात्काळ घटनास्थळी येऊन नागरिकांची समस्या दूर करण्याची आदेश दिले आहेत


प्रशासकीय अधिकाऱ्यांनी  नुकसानग्रस्त नागरिकांना मदत म्हणून आर्थिक सहाय्यता करण्याचे कबूल केले.व प्रशासन नक्कीच नुकसान  भरपाई देईल अशी हमी दिली. 


पाहुया जिल्हा परिषद सदस्य श्री संजय झाडे व गावकरी यांची प्रतिक्रिया

पुढाकार 24  न्यूज करीता रामटेक प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या